
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
आर्थिक आणि राजकीय स्वार्थापोटी काही जणांनी पक्ष सोडला असला तरीही आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय संपादनासाठी एकदिलाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्षनेते माझा दानवे यांनी सांगितले. शिवसेनेच्या जालना जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
शिवसेना जालना जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली
याप्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे,जिल्हाप्रमुख महेश नळगे, भानुदास घुगे, रमेश गव्हाड,भगवान कदम, गणेश काळे, मुरली शेजुळ,मनीष श्रीवास्तव, उत्तमराव वानखेडे व दर्शन चौधरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis