पुणे -२८ कारखान्यांना परवाने, साखरेचा गाळप हंगाम सुरू
पुणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.)राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असून, दोन दिवसांत त्या
sugar


पुणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.)राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे, तर उर्वरित कारखान्यांच्या परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि निधी भरण्याची प्रक्रिया प्रादेशिक स्तरावर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.राज्यातील गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने नुकताच घेतला होता. त्यानुसार शनिवारपासून (ता. १) हंगामाची अंमलबजावणी झाली आहे. साखर आयुक्तालयामार्फत परवाने देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच ७२ कारखान्यांच्या प्रस्तावांवर प्रादेशिक स्तरावर कार्यवाही सुरू आहे.यात पैसे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तर ७८ कारखान्यांच्या परवान्यांबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित कारखान्यांना देण्यात आल्याचेही डॉ. कोलते यांनी सांगितले. याशिवाय ऊस गाळपाशी संबंधित विविध निधी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली, तरी त्यासाठी हमीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande