औरंगाबाद : कृषीपंपांच्या जोडणीत महावितरणने ओलांडला लाखांचा टप्पा
औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) शेतकर्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे ला
औरंगाबाद : कृषीपंपांच्या जोडणीत महावितरणने ओलांडला लाखांचा टप्पा


औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) शेतकर्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने केलेल्या गतिमान कारवाईला यश येत असून चालू आर्थिक वर्षात नवीन कनेक्शन देण्याच्या बाबतीत एक लाखाचा टप्पा नुकताच ओलांडला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

ऊर्जा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना महावितरणला दिली होती. महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सुमारे पन्नास हजार कृषी पंपांना वीज कनेक्शन दिली होती. त्यापेक्षा जास्त कनेक्शन नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या तीन महिन्यात देण्यात आली. महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार कामाला गती आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 31 मार्च 2023 पर्यंत आगामी दोन महिन्यात मोठ्या संख्येने शेतकर्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande