शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
नवी दिल्ली , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।“भारत 1950 पासून शांतता मोहिमांमध्ये आपली भूमिका बजावत आहे. तथापि, आता युद्धाचा स्वरूप बदललेला आहे. शांतता राखण्यासाठी सैन्य दलांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार काम करणे आवश्यक आहे. जेव्हा सर्व सैन्यदल एकत्रितपणे
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल -  लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी


नवी दिल्ली , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।“भारत 1950 पासून शांतता मोहिमांमध्ये आपली भूमिका बजावत आहे. तथापि, आता युद्धाचा स्वरूप बदललेला आहे. शांतता राखण्यासाठी सैन्य दलांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार काम करणे आवश्यक आहे. जेव्हा सर्व सैन्यदल एकत्रितपणे काम करतात, तेव्हाच ऐक्याची खरी ताकद दिसून येते,” असे आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संयुक्त राष्ट्र सैन्य योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत बोलताना सांगितले.

उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, शांतता राखण्यात भारताचे मोठे योगदान आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत 11 संघर्षप्रवण भागांपैकी 9 ठिकाणी भारतीय लष्कर आपले योगदान देत आहे. ते म्हणाले, “संपूर्ण जग हे एक कुटुंबासारखे आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. ” त्यांनी सांगितले की, नीळ हेल्मेट घालणाऱ्या (संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेतील) लोकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, “सध्या आर्थिक सहकार्यही कमी होत चालले आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला असे एक संरचना तयार करण्याची गरज आहे जी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम आणि मजबूत असेल.आपल्याला सैन्य संचालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. जलद तैनाती क्षमता वाढवल्या पाहिजेत आणि योगदान देणाऱ्या राष्ट्रांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवली पाहिजे.आपल्याला एकत्र येऊन अशी व्यवस्था तयार करावी लागेल जी मजबूतही असेल आणि जबाबदारही. संयुक्त राष्ट्राचा नैतिक अधिकार हा मानवी मूल्यांवर आधारित आहे.”

----------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande