मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल पाठवून आशियाई कप ट्रॉफी भारताला परत करण्याची विनंती केली असल्याची माहिती आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजयानंतर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात ठेवली. बीसीसीआयने नक्वी यांना नवीन इशारा दिला आहे.ज्यामध्ये त्यांनी ट्रॉफी भारतात परत करावी अशी मागणी केली आहे अन्यथा पुढील महिन्याच्या बैठकीत हे प्रकरण आयसीसीकडे नेले जाऊ शकते.
३० सप्टेंबर रोजी झालेल्या एसीसीच्या बैठकीत, बीसीसीआयने नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध केला आणि सांगितले की, आशिया कप एसीसीचा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आग्रह धरला की आशिया कप २०२५ ट्रॉफी अधिकृतपणे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला सोपवावी आणि ताबडतोब आशियाई क्रिकेट परिषदेकडे परत करावी.यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एसीसी अध्यक्षांच्या कृतींवर टीका केली आणि त्यांना अयोग्य म्हटले. सैकिया म्हणाले होते की, आम्ही एसीसी अध्यक्षांकडून आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारणार नाही, जे पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ही एक जाणूनबुजून आखलेली रणनीती होती. ते पुढे म्हणाले, हे त्यांना ट्रॉफी आणि पदके सोबत घेऊन जाण्याचा अधिकार देत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील.
बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याची तयारी करत आहे. भारतीय बोर्ड एसीसी अध्यक्षांच्या वर्तनाविरुद्ध औपचारिक आणि तीव्र निषेध नोंदवण्याची योजना आखत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे