राहुल गांधी हे ‘सिरीयल लायर’ – देवेंद्र फडणवीस
मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ‘सिरीयल लायर’ (सातत्याने खोटं बोलणारे) असल्याचे घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी केली. मुख्यमंत्री फडणवीस ‘सायबर जनजागृती महिना’ उद्
देवेंद्र फडणवीस


मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ‘सिरीयल लायर’ (सातत्याने खोटं बोलणारे) असल्याचे घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी केली. मुख्यमंत्री फडणवीस ‘सायबर जनजागृती महिना’ उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कोलंबिया येथील मेडेलिनमध्ये राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लोकशाही व्यवस्थेचे स्वरूप चीनपेक्षा वेगळे आणि अधिक गुंतागुंतीचे आहे. भारतात विविध परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक आहे आणि चीनसारखी हुकूमशाही येथे चालणार नाही. यापार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांना भारताचा इतिहास माहिती नाही. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय जनतेने ती फेटाळून लावली. भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले असून, कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष ते कमकुवत करू शकत नाही. परंतु राहुल गांधी यांना भारताच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना 'अमीबा' या सूक्ष्मजीवाशी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी विकासासंदर्भात एकही शब्द उच्चारलेला नाही. मी तर विनोदाने म्हणतो, त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले.”

ते म्हणाले की, “सायबर जगतातील विविध उपकरणे तरुणांच्या मनाला ‘हॅक’ करून अराजकता निर्माण करू शकतात. एखादा व्यक्ती आपल्या खोलीत बसून लोकांच्या मनात संविधानविरोधी विचार घालू शकतो.”फडणवीस यांनी यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर सतत एकाच प्रकारचे व्हिडीओ दाखवले जातात, ज्यामुळे लोकांची विचारसरणी प्रभावित होते, असे सांगितले. “तरुण प्रश्न विचारतात, जे योग्य आहे. मात्र या प्रवृत्तीचा सकारात्मक तसेच नकारात्मक वापर होऊ शकतो. तथाकथित ‘शहरी नक्षलवादी’ ही आता नव्या प्रकारची भीती निर्माण करत आहेत, जी लोकांमध्ये नकारात्मकता पसरवते, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी अशी शिफारस केली की, सायबर सुरक्षा शिक्षण तिसऱ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, जेणेकरून भावी पिढी सायबर धोक्यांपासून सजग राहील.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande