शेतकऱ्यांच्या अस्मानी संकटाच्या काळात शासन सोबत - पालकमंत्री भोसले
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जावू नये. या अस्मानी संकटाच्या काळात शासन तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन म्हणून सर्वोतोपरी मदत केली जाईल.अशी ग्वाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल
अ


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जावू नये. या अस्मानी संकटाच्या काळात शासन तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन म्हणून सर्वोतोपरी मदत केली जाईल.अशी ग्वाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिली.

लातूर जिल्यातील जळकोट तालुक्यातील तिरुका येथे तिरु नदीवरील बॅरेजची आणि पुलाची पाहणी केली. नदीकाठची खरडून गेलेली जमीन, पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसानग्रस्ताना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटचे तहसीलदार राजेंद्र लांडगे, गट विकास अधिकारी मेढेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती रामचंद्र तिरुके, श्याम डावळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजून काही पंचनामे राहिले, असतील तर ते तातडीने करावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतची २४४ कोटींची मदत मिळाली आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. पीक विमा भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे अहवाल महत्वाचे असल्याने कृषी विभागाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुरामुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंधारे, बॅरेज, तलावांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. तातडीने करणे आवश्यक असलेली कामे आणि दीर्घकालीन उपाययोजना या दोन टप्प्यात कामे होणार आहेत.

तिरुका येथील पुलाच्या कामाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. नियमानुसार योग्य तोडगा काढून पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande