मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। जगातील कोणतीही ताकद भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यापासून रोखू शकत नाही, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले. ते ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सरकार देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. गोयल यांनी सांगितले की, फिनटेक जगातील भागीदार ते एक प्रमुख शिल्पकार असा भारत जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करत आहे. जागतिक पातळीवरील उपक्रमांचे नेतृत्व करत आहे. त्यांनी हेही म्हटले की, भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावेल.
गोयल म्हणाले की, आज जग भारताकडे विश्वास आणि आत्मविश्वासाने पाहत आहे. भारतासोबतची भागीदारी ही उच्च दर्जाची प्रतिभा, कौशल्य, वस्तू व सेवा यांची हमी देते आणि वेळेवर वितरणाची वचनबद्धता देखील दर्शवते.
‘भारताचे डिजिटल वचन: सर्वांसाठी विश्वास, व्यापार आणि तंत्रज्ञानाची निर्मिती’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, मला अत्यंत आनंद होत आहे. वाणिज्य मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत जागतिक स्तरावर एआयचा अवलंब करण्यामध्ये अग्रणी ठरेल आणि आपल्या तरुण प्रतिभा या क्षेत्रात पुढाकार घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेला गती देतील.शेवटी गोयल म्हणाले की, हे संपूर्ण पायाभूत संरचना हे सुनिश्चित करेल की मुंबईतील प्रत्येक नागरिक एका तासापेक्षा कमी वेळात घरातून कार्यस्थळापर्यंत पोहोचू शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule