इथिओपिया ज्वालामुखीतून उठलेला राखेचा मोठा लोट भारताकडे; विमानसेवांवर परिणाम
नवी दिल्ली , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया देशातील हैली गुबी ज्वालामुखीचा 12 हजार वर्षांनंतर झालेला स्फोट आता भारतापर्यंत परिणाम दाखवत आहे. ज्वालामुखीतून उठलेला प्रचंड राखेचा ढग भारताच्या हवाई क्षेत्रात पोहोचला असून उड्डाण संचालना
इथिओपिया ज्वालामुखीतून उठलेला राखेचा मोठा लोट भारताकडे; विमानसेवांवर परिणाम


नवी दिल्ली , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया देशातील हैली गुबी ज्वालामुखीचा 12 हजार वर्षांनंतर झालेला स्फोट आता भारतापर्यंत परिणाम दाखवत आहे. ज्वालामुखीतून उठलेला प्रचंड राखेचा ढग भारताच्या हवाई क्षेत्रात पोहोचला असून उड्डाण संचालनासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. घट्ट राखेच्या ढगामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. योग्य वेळी नागरिक उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना प्रभावित भागांपासून दूर राहण्याचे, मार्ग बदलण्याचे आणि सतर्क राहण्याचे निर्देश जारी केले. जारी निवेदनानुसार याचा सर्वाधिक परिणाम दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील प्रदेशांमध्ये दिसत आहे.

माहितीनुसार, हैली गुबी ज्वालामुखी रविवारी सुमारे 12,000 वर्षांनंतर उद्रेक झाला. त्या उद्रेकातून उठलेली राख रेड सी पार करत यमन, ओमानमार्गे अरबी समुद्र व उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकली. सध्या राखेचे दाट ढग दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या वरून जात आहेत. तज्ञांनी सांगितले की ही राख फार मोठ्या उंचीवर असल्यामुळे जमिनीवरील वायू गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, तरीही सतत निरीक्षण सुरू आहे. राखेच्या धोक्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द किंवा मार्ग बदलणे सुरू केले आहे. अकासा एअरने जेद्दा, कुवैत आणि अबू धाबीसाठी 24–25 नोव्हेंबरची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. केएलएम रॉयल डच एअरलाइन्सनेही आपल्या अॅमस्टरडॅम–दिल्ली (KL 871) आणि दिल्ली–अॅमस्टरडॅम (KL 872) उड्डाण सेवा रद्द केल्या आहेत.

दुसरीकडे इंडिगोने प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देत अनेक उड्डाणांचे मार्ग आणि संचालनात बदल केले. इंडिगोने एक्सवर म्हटले की अशा बातम्या चिंता वाढवू शकतात, पण प्रवाशांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. या प्रकरणात डीजीसीए ने सर्व विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. डीजीसीए ने सांगितले की राख असलेल्या प्रदेशांत आणि उंचीवरून उड्डाणे टाळावीत. विमान कंपन्यांनी उड्डाण मार्ग आणि इंधनाची योजना बदलावी तसेच इंजिनची समस्या, केबिनमध्ये धूर वा वास जाणवणे यांसारख्या कोणत्याही संशयित राख-संबंधी घटनेची तात्काळ नोंद करावी.

डीजीसीए च्या सल्ल्यात विमानतळांबाबतही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विमानतळांनी रनवे, टॅक्सीवे आणि एप्रनवर राखेची तपासणी करावी आणि गरज भासल्यास संचालन थांबवावे. तसेच विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनाने उपग्रह चित्रे आणि हवामान विभागाकडून सतत अद्यतने घेत राहावीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande