परभणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरग्रस्तांना धान्याचे वाटप
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल बाधित व इतर नागरिकांनी यावेळी समाधान
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल बाधित व इतर नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांचे संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. आज जिल्हाधिकारी यांनी स्वत: मानवत तालुक्यातील पूरबाधीत गावे थार, वांगी, वझुर या ठिकाणी भेट देऊन संपर्क तुटलेल्या गावांची त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित व स्थलांतरीत नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना धीर दिला. त्यांच्या हस्ते बांधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले.

याप्रसंगी जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले भारतीय सेनादलाच्या 54 मिडीयम रेजिमेंट 56 एपीओचे लेफ्टनंट कर्नल अभिषेक, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसिलदार पांडुरंग माचेवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande