इराण सरकारने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा- युएनए सरचिटणीस गुटेरेस
न्यूयॉर्क , 12 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सातत्याने वाढत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इराणी सरकारला कठोर पण संवेदनशील आवाहन केले आहे. परिस्थिती हाताळताना सरकारने अत्यंत संयम दाखवावा तसेच ना
इराण सरकारने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा- युएनचे सरचिटणीस गुटेरेस


न्यूयॉर्क , 12 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सातत्याने वाढत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इराणी सरकारला कठोर पण संवेदनशील आवाहन केले आहे. परिस्थिती हाताळताना सरकारने अत्यंत संयम दाखवावा तसेच नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारांचा पूर्ण सन्मान करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या आपल्या निवेदनात गुटेरेस यांनी सांगितले की, इराणमधील आंदोलनकर्त्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या आणि अत्याधिक बळाच्या वापराच्या बातम्यांमुळे ते हादरले आहेत. अनावश्यक किंवा असमतोल बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. तसेच इराणमध्ये माहितीपर्यंतचा प्रवेश पुन्हा सुरू करावा, विशेषतः दळणवळण सेवा पुनर्स्थापित कराव्यात, जेणेकरून लोकांना सत्य माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

संयुक्त राष्ट्र महासचिवांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा गेल्या १५ दिवसांत इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनांदरम्यान किमान ४२० जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मृतांमध्ये आठ निरपराध मुलांचाही समावेश आहे. ही माहिती ‘ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स इन इरान’ या संस्थेने दिली असून, आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही ती वृत्तांकित केली आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायल इराणमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि इराणी नागरिक दाखवत असलेले धैर्य संपूर्ण जग पाहत आहे, असे त्यांनी म्हटले.

हे आंदोलन २८ डिसेंबर रोजी वाढती महागाई आणि आर्थिक संकटाविरोधात सुरू झाले होते. मात्र लवकरच त्याचे रूपांतर देशव्यापी आंदोलनात झाले. अनेक शहरांमध्ये चकमकी, अटकसत्र आणि सरकारकडून कठोर कारवाई पाहायला मिळाली. मानवाधिकार संघटनांनी मृतांची वाढती संख्या आणि आंदोलनकर्त्यांशी केले जात असलेल्या वागणुकीबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, इराणी सरकारचा दावा आहे की हे सर्व परकीय हस्तक्षेप आणि दंगेखोरांमुळे घडत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande