
तेहरान , 30 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे आयोजन करण्यास तो तयार आहे. मात्र, पाकिस्तानचा हा प्रस्ताव इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने सोमवारी स्पष्ट केले की अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. केवळ मध्यस्थांमार्फत अत्यंत जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत.
महावाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. फक्त मध्यस्थांमार्फत अतिशय जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेची कूटनीती सतत बदलत असते, मात्र आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.”
इराणच्या मंत्र्यांनी पुढे म्हटले, “पाकिस्तानने उपलब्ध करून दिलेले मंच हे त्यांचे स्वतःचे आहेत; आम्ही त्यात सहभागी झालो नाही. युद्ध समाप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रादेशिक आवाहनांचे आम्ही स्वागत करतो, परंतु हे युद्ध नेमके कोणी सुरू केले, हेही लक्षात ठेवले पाहिजे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode