
मुंबई, 22 एप्रिल, (हिं.स.) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आमनेसामने येणार आहेत. यावेळी ते अनुक्रमे त्यांचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि एम.एस. धोनी यांच्या पुनरागमनाची वाट पाहत असून सातत्याच्या शोधात असतील.
रोहित (हॅमस्ट्रिंग) आणि धोनी (पायदंडाचा स्नायू दुखावणे) पुनरागमनाच्या मार्गावर आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या या आयपीएल सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर या दोघांपैकी कोणी मैदानात उतरेल की नाही, हे पाहणे बाकी आहे. मंगळवारी ऐच्छिक सत्रादरम्यान रोहित सरावाला गैरहजर होता, तर या आयपीएलमध्ये अद्याप न खेळलेल्या धोनीने सराव केला, ज्यामुळे 'इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट' म्हणून त्याच्या संभाव्य पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.
ही समस्या केवळ या दोन भारतीय दिग्गजांपुरती मर्यादित नाही, तर दोन्ही संघ , ज्यांच्याकडे मिळून १० आयपीएल विजेतेपदे आहेत. ते अजूनही अनेक आघाड्यांवर विविध समस्यांशी झुंजत आहेत.
इतर संघांप्रमाणेच, सीएसकेनेही फॉर्म आणि योग्य संघ संयोजनाच्या शोधात स्पर्धेला सुरुवात केली आणि संघ स्थिरावत आहे असे वाटत असतानाच, २०१ धावा करणाऱ्या स्थानिक क्रिकेटपटू आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची दुखापत होऊन मोठा धक्का बसला आहे.
पुन्हा एकदा चेन्नईचा संघ नव्याने रणनीती आखण्याच्या स्थितीत येऊन ठेपला आहे. आपल्या फलंदाजीच्या फळीतील उणीव भरून काढण्याचा ते प्रयत्न करत असून, यासाठी उपलब्ध पर्यायांमध्ये गुजरातचा यष्टीरक्षक-फलंदाज 'उर्विल पटेल' याचाही समावेश आहे.
सरफराजने १४७ धावा करत सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी फलंदाजीच्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावत असूनही, त्याला आपल्या डावाची चांगली सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यात अद्याप यश आलेले नाही. विशेषतः अशा वेळी, जेव्हा कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ ८२ धावा केल्या आहेत. तो या हंगामात निराशाजनक कामगिरीचा सामना करत आहे. संजू सॅमसनवर देखील बरेच काही अवलंबून असेल, कारण भारताचा हा यष्टीरक्षक-फलंदाज त्याच्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरीतील पराक्रमाच्याच मैदानावर परतत आहे.
सीएसके देखील आपली सलग दोन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करण्याच्या प्रयत्नात असेल. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या त्यांच्या अलीकडील मजबूत कामगिरीवर त्यांचा विश्वास आहे, कारण त्यांनी मागील पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघ प्रत्येकी चार गुणांवर असल्याने, सातव्या स्थानावरील मुंबई इंडियन्स (०.०६७) आणि आठव्या स्थानावरील सीएसके (-०.७८०) यांच्यात केवळ नेट रन रेटचा फरक आहे. कारण फॉर्मात असलेले संघ आठ किंवा अधिक गुणांसह आधीच पुढे गेले आहेत.
अहमदाबादमध्ये तिलक वर्माच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला सलग चार सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित मदत झाली. पण पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनही नुकसान नियंत्रणाच्या प्रयत्नात आहे. पण मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता भारतीय टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या फॉर्मची आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत एक केवळ अर्धशतक झळकावले आहे. तर पांड्याला गरजेच्या वेळी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करता आलेली नाही किंवा डाव सावरता आलेला नाही. या दोन्ही परिस्थितीत, नमन धीरवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि पंजाबच्या या फलंदाजाने ती जबाबदारी मोठ्या कौशल्याने पार पाडली आहे.
जसप्रीत बुमराहने विकेट्स घेण्यास सुरुवात केल्याने मुंबई इंडियन्सला त्यांच्या ९९ धावांच्या दणदणीत विजयात मोठा दिलासा मिळाला. अश्वनी कुमारने घेतलेल्या चार विकेट्समुळे संघातील चिंता कमी झाली. कारण ट्रेंट बोल्ट, दीपक चहर किंवा हार्दिक पांड्या यांपैकी कोणीही सुरुवातीला सातत्याने विकेट्स मिळवून देऊ शकलेले नाही.
मुंबईसाठी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू विल जॅक्स भारतात दाखल झाला असून, गुरुवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी तो संघाच्या शिबिरात सामील झाला आहे. सध्या तो वानखेडे स्टेडियमवर सराव करत असून, त्याच्या आगमनामुळे संघ आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे