केंद्र सरकारने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवरील बंदी आणखी 4 आठवड्यांसाठी वाढली
नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.)। केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात अंदाज/अनुमान आणि सनसनाटी बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण
Ministry of Information and Broadcasting


नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.)। केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात अंदाज/अनुमान आणि सनसनाटी बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्रायल-इराण संघर्षादरम्यान खोट्या आणि काल्पनिक बातम्यांच्या प्रसारणानंतर, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला (बीएआरसी) हा निर्देश जारी केला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या युद्धाच्या परिस्थितीचे अनावश्यकपणे खळबळजनक/सनसनाटीकरण करत आहेत. अशा प्रकारच्या मजकुरामुळे सामान्य जनतेमध्ये, विशेषतः बाधित भागातील कुटुंबांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते.

हे लक्षात घेऊन, सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी अहवालावर चार आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. या कालावधीत, वाहिन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन सामान्य प्रक्रियेनुसार केले जाणार नाही. हे उल्लेखनीय आहे की, ६ मार्च रोजी पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वृत्तवाहिन्यांचे टीआरपी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande