
छत्रपती संभाजीनगर, 29 मे (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर येथील
१५ दिवसांपासून कचरा डेपोत धूर येत आहे यामुळे,त्रस्त नागरिकांचा घर सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले
छत्रपती संभाजीनगर शहरातील कचरा डेपोला लागलेल्या आगीला पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटूनही धुराचे लोट अद्याप सुरूच आहेत. सततच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी काही नागरिकांनी घर व फ्लॅट विकून परिसर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.आगीच्या घटनेचे १५ दिवस उलटून झाले असा नागरिकांना कशामुळे त्रास होतो असे अनेक नागरिकांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis