
-सुरक्षा हटवण्यामागे माजी मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप
पाटणा, 17 जून (हिं.स.)माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी, त्यांच्या आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सुरक्षेत कपात केल्याप्रकरणी तसेच सरकारी गृहनिर्माण वादावरून नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, हे सर्व माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे.लालू प्रसाद यांनी म्हटले आहे की, त्यांची आणि राबडी देवी यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याबद्दल विचारले असता, त्यांनी थेट सांगितले की यामागे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हात आहे.
केवळ एक दिवस आधी, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी १०, सर्क्युलर रोड येथील शासकीय निवासस्थानात त्यांच्या वास्तव्याला मुदतवाढ देण्याची विनंती करणारे पत्र सरकारला पाठवले होते. त्यांच्या सचिवांनी पाठवलेल्या या पत्रात, जोपर्यंत त्या बिहार विधान परिषदेच्या सदस्य आहेत, तोपर्यंत त्यांना त्याच निवासस्थानात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. राबडी देवी यांचा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ ६ मे २०३० रोजी संपत आहे. इमारत बांधकाम विभागाने बंगला रिकामा करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत १५ जून रोजी संपली आहे. त्यामुळे, प्रशासन नियमांनुसार पुढील कारवाई करू शकते.
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांनीही १० सर्क्युलर रोड येथील आपले निवासस्थान रिकामे करण्यास सहमती दर्शवली आहे. त्या ३९ हार्डिंग रोड येथे राहायला जातील, पण काही अटींवर. त्यांनी बांधकाम विभागाला पत्र लिहून स्पष्टपणे म्हटले आहे की, लालू प्रसाद यांच्या प्रकृतीचा विचार करून बंगल्यामध्ये रॅम्प आणि लिफ्टची सोय करण्यात यावी. त्यानंतर त्या नवीन बंगल्यात राहायला जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे