
छत्रपती संभाजीनगर, 22 जून (हिं.स.)।
मी आमदार झालो तरी माझे पाय जमिनीवर राहतील अशी प्रतिक्रिया आमदार सुहास शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयानंतर आमदार सुहास शिरसाठ यांनी नम्र भूमिका मांडली. आमदार झालो तरी माझे पाय जमिनीवरच राहतील, असे सांगत त्यांनी हा विजय महायुतीच्या सर्व नेत्यांचे,कार्यकर्ते आणि मतदारांना समर्पित केला. महायुतीच्या एकजुटीमुळे हा विजय शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.निवडून आलेले नवनिर्वाचित भाजप आमदार सुहास शिरसाठ यांच्याशी संवाद साधला आजचा त्यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील प्रयत्न केले यामुळे हे यश मिळाले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा विकास करणे हे आपले प्रमुख ध्येय आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis