‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’मधून कीटकनाशक शेतीच्या गंभीर समस्येवर प्रकाश
कोल्हापूर, 18 जुलै (हिं.स.) : कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे शेती आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर भाष्य करणाऱ्या ‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्
 'द इंडिया स्टोरी' हिंदी चित्रपट


कोल्हापूर, 18 जुलै (हिं.स.) : कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे शेती आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर भाष्य करणाऱ्या ‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून दडलेले वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सत्य, न्याय आणि जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित या चित्रपटात दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाची सांगड घालण्यात आली आहे. लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या वाढत्या संकटाची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न मांडतो.

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरबद्दल बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ चित्रपट नसून समाजाने गंभीरपणे विचार करावा असा महत्त्वाचा संवाद आहे. प्रत्येक घरावर शांतपणे परिणाम करणाऱ्या विषयावर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांनी या विषयावर प्रश्न विचारावेत आणि वास्तव समजून घ्यावे, हीच अपेक्षा आहे.”

अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी सांगितले की, “‘द इंडिया स्टोरी’चा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण अनुभव आहे. माझी व्यक्तिरेखा सर्व अडचणींना सामोरे जात सत्यासाठी उभी राहते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.”

अभिनेता श्रेयस तळपदे म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर चित्रपटाचा भावनिक गाभा प्रभावीपणे मांडतो. एका सामान्य माणसाने आशा आणि जिद्दीच्या जोरावर मोठ्या आव्हानाविरुद्ध दिलेल्या लढ्याची ही कथा आहे. चित्रपटाचा संदेश प्रत्येक प्रेक्षकाला आपलासा वाटेल.”

या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनीता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये छायांकनाची जबाबदारी निशांत भागवत यांनी सांभाळली असून, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी आणि ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande