
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.)।केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. हे अभियान भारताच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक असून, केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ च्या प्रयत्नांमध्ये सर्वांना एकत्र आणते, असे त्यांनी म्हटले.
अमित शाह यांनी ‘एक्स’वर संदेश शेअर करत नागरिकांना तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे, ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्याचे तसेच ‘हर घर तिरंगा डॉट कॉम’ या संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन केले. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवले जात असल्याने प्रत्येक देशभक्तासाठी हे अभियान अधिक विशेष ठरले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 9 ऑगस्ट रोजी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ आंदोलनात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तिरंगा हा भारताच्या अभिमानाचे प्रतीक असून, प्रत्येक नागरिकासाठी तो प्रेरणास्रोत आहे, असे त्यांनी म्हटले.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 6 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ‘हर घर तिरंगा 2026’ अभियानाची सुरुवात केली. हे अभियान 9 ते 17 ऑगस्टदरम्यान देशभरात राबवले जाणार आहे. हे अभियान देशातील सर्वांत मोठ्या जनसहभागाच्या उपक्रमांपैकी एक बनले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode