महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा
नवी दिल्ली, 06 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना म्हटले की, रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची समस्या केवळ एखाद्या परीक्षेशी क
Rahul Gandhi


नवी दिल्ली, 06 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना म्हटले की, रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची समस्या केवळ एखाद्या परीक्षेशी किंवा भरतीशी संबंधित नाही, तर ही संपूर्ण व्यवस्थेवरील तुटलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागणीचा त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी विचार करता ती योग्य आहे आणि सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले की, महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. पेपर लीक, रखडलेल्या भरती, शिक्षणाचा वाढता खर्च, वसतिगृहांमधील अमानवीय परिस्थिती, खराब जेवण आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये कथित फसवणूक अशा समस्यांशी विद्यार्थी झुंजत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेबाबत त्यांनी म्हटले की, या संस्थेवर कब्जा करून तिच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवण्यात आला आहे. राहुल यांनी सरकारकडे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला नाही, तर न्याय मिळेपर्यंत त्यांच्या आंदोलनाचा आवाज आणखी तीव्र होत जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande