रत्नागिरी : राजापूरचे अजित यशवंतराव राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत
रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील पक्षांतर सुरू झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूरचे नेते अजित यशवंतराव यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महारा
अजित यशवंतराव शिवसेनेत दाखल


रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील पक्षांतर सुरू झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूरचे नेते अजित यशवंतराव यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून अजित यशवंतराव यांचे पक्षात स्वागत केले. तरुण, उमदा, सुशिक्षित आणि मनापासून काम करणारा तरुण शिवसेनेत आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सात वर्षांनी श्री. यशवंतराव शिवसेना परिवारात आले आहेत. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता ते पक्षात आले आहेत. अनेक जण पक्षात येऊ इच्छितात पण त्यांना तिकीट हवे असते. श्री. यशवंतराव तिकिटाची मागणी न करता पक्षात आले आहेत. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास सुखकर करणे ही माझी जबाबदारी आहे. आताचा काळ आपल्या संघर्षाचा काळ आहे. पक्ष, चिन्ह चोरलेले आहे. आता आपली नवीन निशाणी मशाल आहे. या निशाणीवर आपले नऊ खासदार निवडून आले. ही मशाल मनामनात पोहोचलेली आणि पेटलेली आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे तसे माझ्याकडे तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसे आहेत. सगळ्यांसमोर सांगतो तुमच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार राजन साळवी, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande