विदर्भातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान
मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल रोज
मतदान


मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी : रामटेक २८.७३ टक्के, नागपूर २८.७५ टक्के, भंडारा-गोंदिया ३४.५६ टक्के, गडचिरोली-चिमूर ४१.०१ टक्के आणि चंद्रपूर ३०.९६ टक्के

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande