प. बंगाल : भाजपला 35 जागा दिल्यास घुसखोरी थांबवू
गृहमंत्री अमित शहांचे करनदीघी येथील सभेत आश्वासन कोलकाता, 23 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या जनते
अमित शाह


गृहमंत्री अमित शहांचे करनदीघी येथील सभेत आश्वासन

कोलकाता, 23 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या जनतेने गेल्या निवडणुकीत आम्हाला 18 जागा दिल्या होत्या. यावेळी 35 जागांवर भाजपला विजयी केल्यास आम्ही घुसखोरी थांबवू असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. गृहमंत्री आज, मंगळवारी पश्चिम बंगालच्या करनदीघी येथे आयोजित प्रचार रॅलीत बोलत होते.

यावेळी गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला हात लावण्याचे धाडस नाही. तृणमूलच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी अव्याहतपणे सुरू आहे. मुख्यमंत्री सीमावर्ती राज्यात घुसखोरी थांबवू शकत नाहीत. ममता बॅनर्जी घुसखोरी थांबवू शकतात का? त्या रोखू शकत नाहीत. फक्त मोदीजी घुसखोरी थांबवू शकतात. गेल्या वेळी तुम्ही आम्हाला 18 जागा दिल्या होत्या. मोदींनी राम मंदिर दिले. यावेळी आम्हाला 35 जागा द्या, आम्ही घुसखोरी थांबवू असे शाह यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्र्यांनी संदेशखाली वादाचाही उल्लेख करताना सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी महिलांवर अत्याचार होऊ दिले जेणेकरून त्यांच्या व्होट बँकेवर परिणाम होऊ नये. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि आज आरोपी तुरुंगात आहेत.अनियमिततेमुळे सरकारी शाळा कर्मचाऱ्यांच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अमित शाह यांनी संदर्भ दिला. भाजपाला मत द्या, ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटं लटकवले जाईल. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास केंद्र उत्तर बंगालमध्ये एम्स बांधेल, असे आश्वासनही अमित शाह यांनी दिले.आम्ही रायगंजमध्ये एम्सची योजना आखली होती. ममता दीदींनी ते बंद केले. ही मोदीजींची गॅरंटी आहे. आम्हाला 30 जागा द्या, आम्ही उत्तर बंगालमध्ये पहिल्या एम्सचे काम सुरू करू असे सांगितले. भाजपने 2019 मध्ये रायगंजची जागा जिंकली होती. उत्तर बंगालमधून तृणमूलने आमदार कृष्णा कल्याणी यांना उमेदवारी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande