अमरावती, 3 जून (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी शहरातील स्वच्छता कामगारांना गेल्या दोन महिन्या 'पासून पगार न मिळाल्यामुळे त्यांनी १ जून २०२५ पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटदाराने पगार थकविल्याने कामगारांवर उपासमारीची पाळी आली असून कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन गावंडे यांनी जोपर्यंत कंत्राटदार कामगारांचे पगार करणार नाही तोपर्यंत काम बंद राहणार असा इशारा दिला आहे.
कंत्राटी सफाई कामगार यांचे माहे एप्रिल व मे २०२५ दोन महिन्याचे मासिक वेतन थकविल्याने मजुरांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. पगार न झाल्याने दोन वेळच्या जेवणाची अडचण झाली तसेच मुलांचे प्रवेश, शाळेची फी, दवाखाना इत्यादी कामासाठी परिस्थिती बिकट आली आहे. यास कारणीभूत नगर परिषदेचा असून नगर परिषदेने ठेकेदाराचे बिल दिले नाही म्हणून मजुरांचे पगार थकविले आहे. हे कारण सांगून कंत्राटदाराने सफाई कामगारांना पगार दिला नाही. म्हणून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या सर्व बाबीचा उलगडा होण्यासाठी सचिन गावंडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन उपस्थित पत्रकारांना कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती दिली. ठेकेदाराने पगार काढलेला नाही. या करिता नगर परिषद अधिकारी आमची जबाबदारी नाही, म्हणून अंग झटकत आहे. या करिता सफाई कामगारांनी दाद कुणास मागावी. मुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराला समज देऊन मजुरांचे पगार व्याजासकट देण्याचे आदेश जारी करावेत, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादी (ब्लॅकलिस्टमध्ये) टाकून त्यास ठेका देण्यात येऊ नये, जेणेकरून पगार थकीत राहणार नाही. तसेच नगर परिषदनेयाबाबततातडीने वनघेतल्यासकामबंद आंदोलताचा पवित्रा घेतला आहे. अशा बेजबाबदार कंत्राटदारांमुळे कामगारांना तसेच जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत. नगर परिषदने व त्यांचे त्यांचे ठेकेदाराने वेतन न दिल्यास मुख्याधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच कामगारांना इपीएफ, पगार वाढ, मेडिक्लेम, साप्ताहिक सुट्टी, सुरक्षा उपकरणे, दोन महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा लागू करण्यात याव्यात अशी मागणी कामगारांनी केली आहे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी