आयपीएल १८ वा हंगाम : आरसीबीने पीबीकेएसचा ६ धावांनी केला पराभव
अहमदाबाद, ३ जून (हिं.स.) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर आपला १८ वर्षांचा आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगची ट्रॉफी उंचावण्याचा दुष्काळ संपवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळुरुने पंजाबचा ६ धावांनी पराभव केला. बंगळुरुला ठरवलेलं १९१ धाव
RCB


अहमदाबाद, ३ जून (हिं.स.) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर आपला १८ वर्षांचा आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगची ट्रॉफी उंचावण्याचा दुष्काळ संपवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळुरुने पंजाबचा ६ धावांनी पराभव केला. बंगळुरुला ठरवलेलं १९१ धावांचं आव्हान पार करता आलं नाही. या विजयानंतर विराट कोहलीला देखील आपले अश्रू अनावर झाले. कृणाल पंड्याच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुला हा विजय साकारता आला. त्याने ४ षटकांत अवघ्या १७ धावा देत २ गडी बाद गेले. कृणालने प्रभसिमरन सिंग आणि धोकादायक जोश इंग्लिशला बाद करता बंगळुरुचा विजय सुकर केला.

पंजाबला कृणालच्या फिरकी गोलंदाजीचं उत्तर शेवटपर्यंत मिळालं नाही. तळाला नेहाल वढेरा आणि शशांकने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. बंगळुरुचा संघ आयपीएलच्याया अंतिम सामन्याचा दबाब योग्यरितीने सांभाळू शकली आणि त्यामुळेच त्यांना पहिल्यांदाच आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं.

पंजबाला अंतिम सामन्यात पराभूत केल्याने बंगळुरुला अठरा वर्षांनी आयपीएलचे अजिंक्यपद पटकावता आले. त्याचप्रमाणे नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीला केवळ आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. अखेर त्याला ही ट्रॉफी पटकावता आल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्याने या हंगामात ६५७ धावा करत आपल्या संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यामध्ये त्याने ८ अर्धशतकही झळकावली आहेत. तर नाबाद ७३ धावा ही त्याची या आय़पीएल हंगामातील सर्वोत्तम खेळी ठरली. कोहलीने आपल्या अनुभवाच्या जोरावर तबब्ल १८ वर्षांनी आपल्या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे आयपीएलचा हा १८ वा हंगामा होता. तसंचं कोहलीचा जर्सी नंबरही १८ आहे. त्याचप्रमाणे ३-०६-२०२५ या दिवशी आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला आणि योगायोग म्हणजे याची बेरीजची १८ होताना दिसते. त्यामुळे या हंगामात नशिबाचीही बंगळुरुला साथ मिळाली.

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सना पहिल्यांदा फलंदाजीचं आमंत्रण दिलं. रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात चांगली झाली नाही. स्फोटक फलंदाज फल सॉल्ट झटपट बाद झाला. त्यानंतर बंगळुरुच्या फंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही त्याचं रुपांतर मोठ्या खेळी करता आलं नाही. धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. त्याने ४३ धावांची संयमी खेळी केली. त्याच्या या संयमी खेळीमुळे आणि जीतेश शर्माच्या तुफानी १० चेंडूत काढलेल्या २२ धावांमुळे बंगळुरुला २० षटकात १९० धावांपर्यंत मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज सपयशी ठरली. त्यांनी कृणाल पंड्याच्या गोलंदाजीसमोर सपेशल गुडघे टाकले. रजत पाटीदाने धुर्त नेतृत्व करत गोलंदाजीत योग्य बदल गेले आणि ठराविक अंतरावर पंजाबचे फलंदाज बाद झाल्याने बंगळुरुने सामन्यावर आपली घट्ट पकड मिळवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande