बुद्धीबळ खेळ गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त - डॉ.कृष्णा बलदवा
अहिल्यानगर, 3 जून, (हिं.स.) :- महेश नवमीच्या निमि त्ताने आयोजित ही बुद्धिबळ स्पर्धा समाजातील एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. आजच्या युगात मानसिक क्षमतांचे आणि निर्णयशक्तीचे महत्व वाढले आहे आणि बुद्धीबळ सारखा खेळ हे गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे.
बुद्धीबळ खेळ गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त


अहिल्यानगर, 3 जून, (हिं.स.) :- महेश नवमीच्या निमि त्ताने आयोजित ही बुद्धिबळ स्पर्धा समाजातील एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. आजच्या युगात मानसिक क्षमतांचे आणि निर्णयशक्तीचे महत्व वाढले आहे आणि बुद्धीबळ सारखा खेळ हे गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. या स्पर्धेतून आपल्या समाजातील युवकांना नवे मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल. अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन मिळावे, असे प्रतिपादन डॉ.कृष्णा बलदवा यांनी केले.

महेश नवमी निमित्त माहेश्‍वरी युवा संघटनेेच्या वतीने बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. कृष्णा नंदकिशोर बलदवा, अल्का बलदवा, मुकुंद धूत, विठ्ठलदास भुतडा, अतुल डागा, युवा संघटनेचे अध्यक्ष शाम भुताडा आदी उपस्थित होते.डॉ. कृष्णा बलदवा पुढे बोलताना म्हणाले की, महेश नवमीच्या निमित्ताने आयोजित ही बुद्धीबळ स्पर्धा समाजातील युवांमध्ये बुद्धिमत्ता, संयम आणि खेळातील कौशल्य वाढविण्यासाठी एक उत्तम मंच आहे.समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमां ना पाठिंबा द्यावा, यामुळे आपल्या समाजाची प्रगती निश्‍चित होईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्तविकात अध्यक्ष शाम भुताडा म्हणाले की, युवकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळाले, म्हणून माहेश्‍वरी युवा संगठनच्यावतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयेजित केले जाते. यावर्षी बुद्धीबळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेत समाजातील अनेक युवक सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande