देहू ते आळंदी पालखी मार्ग संतभूमी म्हणून जाहीर करा - अभय टिळक
पुणे, 24 जून (हिं.स.)।महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी लंडन संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी,
देहू ते आळंदी पालखी मार्ग संतभूमी म्हणून जाहीर करा - अभय टिळक


पुणे, 24 जून (हिं.स.)।महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी लंडन संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून संतभूमी मानतो. देहू ते आळंदी हा १६ किलोमीटर चा पालखी मार्ग राज्य सरकारने संतभूमी म्हणून जाहीर करावा अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली.

पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभय टिळक बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदाय प्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी अभय टिळक यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे उत्तरांचल सरकारने देवभूमी नावाने काही परिसर जाहीर करून त्या परिसरास संरक्षण दिले आहे आणि तेथील पावित्र्य जपून विकास कामे केली आहेत. त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीतील परिसर संतभूमी म्हणून जाहीर करावा. तसेच या भूमीची सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता अखंड राखण्यासाठी शासनाने विशेष निधी देऊन विकास करावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीयमंत्री यांच्याकडे आम्ही करीत आहोत यासाठी आवश्यक तो पत्र व्यवहार व पाठपुरावा केला जात आहे.

हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, या १६ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या किमान १०० मीटर अंतरावरील स्वच्छता राखावी. डॉ. स्वाती मुळे यांनी सांगितले की, वाढत्या नागरीकरणामुळे या भागामध्ये मागील पंधरा वर्षात वेगाने शहरीकरण झाले आहे. संतपीठ हायस्कूल प्रमाणे अनेक शैक्षणिक संस्था या परिसरात कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतूक वाढली आहे. इंद्रायणी नदीच्या किनारी अनेक ठिकाणी प्रदूषित व अस्वच्छ पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande