
इस्लामाबाद, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवार (२८ ऑक्टोबर) रोजी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर भारताच्या हातात खेळण्याचा आरोप करताना सांगितले की, जर काबुलने इस्लामाबादवर हल्ल्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान ५० पट अधिक शक्तीने उत्तर देईल.
एका कार्यक्रमात बोलताना आसिफ म्हणाले, “काबुलमध्ये जे लोक सत्ता चालवत आहेत ते दिल्लीच्या इशाऱ्यावर कठपुतळीप्रमाणे नाचत आहेत. भारतने अफगाणिस्तानाला प्यादा बनवून पाकिस्तान विरोधात कट रचला आहे.” त्यानुसार, पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील तुर्कीतील नुकतीच झालेली चर्चा अनेक वेळा अफगाण वकिलांच्या मागे हटल्यामुळे अपयशी ठरली.
आसिफ म्हणाले, “ज्यावेळीही करार होण्याची स्थिती तयार झाली, काबुलने हस्तक्षेप करून तो मागे घेतला.” आसिफने आरोप केला की भारताला हवय की पाकिस्तानविरुद्ध कमी तीव्रतेचा युद्ध चालू राहिला पाहिजे आणि अफगाणिस्तान हे त्याचे साधन बनले आहे. त्यांनी सांगितले, “पश्चिमी सीमा गमावल्यानंतर भारताने आता काबुलद्वारे पाकिस्तान अस्थिर करण्याची रणनीती अवलंबली आहे.”
स्रोतांच्या मते, तुर्की आणि कतार यांच्या मध्यस्थीत झालेली चर्चा कोणत्याही ठोस निकालाविना संपली. पाकिस्तानाची मुख्य मागणी होती की अफगाणिस्तान आपल्या प्रदेशात सक्रिय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध प्रमाणभूत कारवाई करावी. या विषयावर पाकिस्तानच्या माहिती मंत्री अत्ता उल्लाह तारड यांनीही सांगितले की इस्तंबूल चर्चेत अफगाण पक्ष मुख्य मुद्यापासून वारंवार भटकत राहिला आणि जबाबदारी स्वीकारण्यापासून चुकला.
गत काही आठवड्यांत सीमेवर घडलेल्या संघर्षात अनेक सैनिक आणि नागरीक ठार झाले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जरी १९ ऑक्टोबर रोजी कतारच्या मध्यस्थीत दोहात तात्पुरता युद्धविराम झाला, तरीही त्याने तणाव कायमचा दूर केला नाही.
ख्वाजा आसिफनी सांगितले, “अफगाणिस्तानने इस्लामाबादच्या दिशेने डोळा वर करून पहिले तर आम्ही त्यांचे डोळे काढून टाकू, अफगाणिस्तानाने हे समजून घ्यावे की पाकिस्तान कधीही आपल्या सुरक्षा बाबतीत तडजोड करणार नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode