नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - जुलै २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत (आयटीआय) भारतात द्वितीय स्थान पटकावणाऱ्या लातूरमधील मदिया खदीर सय्यद हिचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला.
गरिबीवर जिद्दीने मात करत, तिचे वडील बांधकाम मजूर असूनही त्यांनी शिक्षणासाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही. मदियाने मिळवलेलं हे यश केवळ तिचं एकटीचं नाही, तर तिच्या आई-वडिलांच्या कष्टाचं, तिच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचं आणि सर्वसामान्य परिस्थितीतून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक मुलीचं प्रतीक आहे.
९९.६६% गुणांसह तिने मिळवलेलं हे यश खरंच खूप प्रेरणादायक आहे. महाराष्ट्राचं आणि रेणापूरचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या या कर्तृत्ववान कन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis