तामलवाडी टोल प्लाजा येथे ५ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय डिजिटल प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा पोलिस प्रशासन धाराशिव यांचे कोजागरी पौर्णिमानिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त ता
तामलवाडी टोल प्लाजा येथे ५ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय डिजिटल प्रदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा पोलिस प्रशासन धाराशिव यांचे कोजागरी पौर्णिमानिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त तामलवाडी टोल प्लाजा येथे दिनांक ५ ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये केंद्र शासनाचे ११ वर्ष सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण या विषयांवर दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार,आमदार, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.हे प्रदर्शन २४ तास सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली देशाने मागील ११ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी,देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहितीसह विकसित भारताच्या अमृत काळामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित,आदिवासी, महिला,युवा,शेतकरी,उद्योजक आणि मध्यमवर्गाच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय,उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया,पंतप्रधान पीक विमा योजना,किसान सन्मान योजना, आवास योजना,पीएम श्री योजना, मुद्रा योजना,आयुष्मान भारतसारख्या कल्याणकारी योजनांची माहिती, पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली विकासकामे,देशाची सुरक्षा,परराष्ट्र धोरण आणि ऑपरेशन सिंदूर इत्यादी विषयांची माहिती चित्र,आकडेवारी, मजकूर आणि ऑडीओ-व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.

कोजागिरी पोर्णिमेनिमित तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता पायी चालत येणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांना केंद्र शासनाने मागील ११ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त भाविकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande