बंजारा समाजाचे पांढरे वादळ धडकले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर
ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. शनिवारी 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत सरकार बंजारा समाजाला हैदराबाद ग
बंजारा समाजाचे पांढरे वादळ धडकले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर


ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. शनिवारी 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत सरकार बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण देत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे ठाण्यातील बंजारा आरक्षण समितीकडून घोषणा करण्यात आली. यावेळी समितीचे कविराज चव्हाण, अनिल राठोड, सुनील जाधव, दिलीप एम जाधव, रणजीत राठोड, नारायण आडे, विक्की राठोड, लखन आडे यांच्याच हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याच अनुषंगाने, हैदराबाद गॅझेटमध्ये 'बंजारा' जमातीचा 'आदिम' जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.

अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आतापर्यंत ३२ मोर्चे राज्यभर झाले आहेत. 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील हा मोर्चा हा सेमीफायनल असून मुंबई जाम करण्यासाठी बंजारा समाज सज्ज असल्याचे बंजारा समाज आरक्षण समितीकडून जाहीर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande