रत्नागिरी : छ. संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्थानिक प्रश्नांवर विचार करण्यास आणि आपल्या लेखणीतून ते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्त
रत्नागिरी : छ. संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन


रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्थानिक प्रश्नांवर विचार करण्यास आणि आपल्या लेखणीतून ते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. स्पर्धेसाठी निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, उपाध्यक्ष मंगेश धावडे आणि जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तरुणांना आपल्या भागातील आरोग्य सुविधा, कृषी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लिखाण करण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेमागील प्रामाणिक उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

यावर्षी महाविद्यालयीन खुल्या गटासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा : सद्यःस्थिती, आव्हाने आणि अपेक्षा तसेच आंबा-काजूच्या पलीकडे : रत्नागिरीतील कृषी विकास का झाला नाही हे दोन विषय आहेत. स्पर्धकांनी १००० ते १२०० शब्दांत स्वलिखित आणि मराठी भाषेतील निबंध सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे ५००१ आणि ३००१ रुपयांची, तर ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकांनी आपले निबंध एम जी टेक्नॉलॉजी, देवरूखहायस्कूलसमोर, देवरूख, संगमेश्वर, जि. रत्नागिरी या पत्त्यावर अंतिम मुदतीपर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी दीक्षा खंडागळे (9404158384), अनघा कांगणे (8552974073), नितीन गोताड (9322516886) आणि मुझम्मिल काझी (9604760330) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande