
छत्रपती संभाजीनगर, 11 डिसेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी बाधवाच्या कुटुंबातील मुला, मुलींना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यताविभागाची जिल्हा कार्यकारणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा कौशल्य कौशल्य ,रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यकआयुक्त राजू वाकोडे, शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या अश्विनी लाठकर, शासकीय तंत्रनिकेतनचे उपसंचालक प्रदीप दुर्गे,प्राचार्य. अभिजीत आलटे,,सिपेट प्रशिक्षण संस्थाचे व्यवस्थापक आर जीवन राम, , इंडो जर्मन टूल्स कंपनी व्यवस्थापक जयेश बागुल, छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाचे कमलाकर कदम, अटल इंक्युबेशन सेंटरशेख नवीद, देवगिरी शासकीय तंत्र निकेतन संस्था एस, जी .गोस्वामी यासह विविध प्रशिक्षण संस्थांच्या समन्वयक आणि प्राचार्य यांची उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय किमान कौशल विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमामध्ये जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुण, तरुणींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील सैन्य दलातील निवृत्त झालेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनाही प्रशिक्षणास प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले.
कौशल्य, रोजगार ,उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारणी समितीच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रशिक्षण संस्था ,शासकीय संस्था, अर्ध शासकीय आणि खाजगी कंपन्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण व्हावे. आगामी काळातील पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्यांची गुंतवणूक आणि निर्मिती जिल्ह्यामध्ये होत असून या कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन जिल्ह्याचा रोजगार निर्मितीमधील सहभाग मोठ्या प्रमाणात असावा यासाठीचे प्रशिक्षण वर्ग आणि त्याचे आयोजन , नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज संबंधित प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास विभागाला दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis