आयपीएल २०२६: साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात दिल्लीची कोलकात्यावर ४० धावांनी मात
कोलकाता, 25 मे (हिं.स.)दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला ४० धावांनी पराभूत केले. ईडन गार्डन्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत पाच गडी गमावून २०३ धावा केल्या. प
दिल्ली कॅपिटल्सचा संघ


कोलकाता, 25 मे (हिं.स.)दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला ४० धावांनी पराभूत केले. ईडन गार्डन्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत पाच गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआर १८.४ षटकांत केवळ १६३ धावाच करू शकली आणि सर्वबाद झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेने त्यांच्यासाठी सर्वाधिक ६३ धावा केल्या. यासह, आयपीएल २०२६ ची साखळी फेरी संपली आहे.

प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. आरसीबी, गुजरात, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. पहिला क्वालिफायर सामना २६ मे रोजी धरमशाला येथे गुणतालिकेतील अव्वल दोन संघ, आरसीबी आणि गुजरात यांच्यात खेळला जाईल. दरम्यान, हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील एलिमिनेटर सामना २७ मे रोजी मुल्लानपूर येथे खेळला जाणार आहे.

या हंगामात दिल्लीची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. त्यांनी १४ पैकी सात सामने जिंकले आणि १४ गुणांसह -०.६५१ च्या नेट रन रेटने सहाव्या स्थानावर राहिले. दरम्यान, केकेआरने सहा सामने जिंकले आणि सात गमावले. याव्यतिरिक्त, पावसामुळे एक सामना रद्द झाला. केकेआर १३ गुणांसह -०.१४७ च्या नेट रन रेटने गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande