भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी ११७ मान्यवरांचे पंतप्रधान मोदी-शहबाज शरीफ यांना खुले पत्र
नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.): भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा सामान्य व्हावेत, या मागणीसाठी दोन्ही देशांतील १०० हून अधिक मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे द
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी ११७ मान्यवरांचे पंतप्रधान मोदी-शहबाज शरीफ यांना खुले पत्र


नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.): भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा सामान्य व्हावेत, या मागणीसाठी दोन्ही देशांतील १०० हून अधिक मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे दोन्ही देशांतील तणाव कमी करून व्हिसा सेवा पुन्हा सुरू करावी, तसेच हवाई क्षेत्र (एअरस्पेस) पुन्हा खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

भारताकडून या पत्रावर फारूक अब्दुल्ला, मीरवाइज उमर फारूक, मेहबूबा मुफ्ती, मनोज झा आणि हुमायून कबीर यांच्यासह ६१ मान्यवरांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आहेत. तर पाकिस्तानातील ५६ प्रमुख व्यक्तींनी या खुल्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी, माजी राजनैतिक अधिकारी अशरफ जहांगीर काझी, नॅशनल असेंब्लीचे सदस्य इस्फनयार भंडारा आणि अणुशास्त्रज्ञ परवेज हूदभॉय यांचा समावेश आहे. हे खुले पत्र सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेस या संस्थेच्या वतीने नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ यांना पाठवण्यात आले आहे.

या पत्रात भारत-पाकिस्तानदरम्यान सध्याचा तणाव संपवून अधिकृत संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे उच्चायुक्तांची (हाय कमिशनर) पुन्हा नियुक्ती करावी. भारत-पाकिस्तानदरम्यान व्हिसा सेवा पूर्ववत सुरू करावी. दोन्ही देशांचे हवाई क्षेत्र (एअरस्पेस) पुन्हा खुले करावे.धार्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन द्यावे. जम्मू-काश्मीर प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू करावी. २००४ आणि २००७ मधील सर्वसमावेशक द्विपक्षीय संवाद प्रक्रिया पुढे नेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande