आसाममध्ये पुरामुळे ९२ गावांतील १४,७९९ नागरिक अजूनही प्रभावित
गुवाहाटी, 21 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पुरामुळे पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४,७९९ नागरिक अजूनही प्रभावित आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी सामान्य होत असताना पूरग्रस्तांचे जीवनही हळूहळू सामान्य होत आहे. प्रभावित लोक आपली घरे आणि शेती पुन्हा सुरळीत
Assam still affected floods


गुवाहाटी, 21 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पुरामुळे पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४,७९९ नागरिक अजूनही प्रभावित आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी सामान्य होत असताना पूरग्रस्तांचे जीवनही हळूहळू सामान्य होत आहे. प्रभावित लोक आपली घरे आणि शेती पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची तसेच सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन अभियानाची सविस्तर माहिती दिली.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २० ऑगस्टच्या आकडेवारीनुसार आता सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये झाले आहे. राज्यात ३,०८३ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे. सध्या मदत छावण्यांमध्ये २३८ लोकांनी आश्रय घेतला आहे. मदत वितरण केंद्रांवर १,१६५ छावणीबाहेरील रहिवाशांना मदत मिळत आहे. प्रभावित भागांमध्ये गुरुवारी राज्य सरकारने ४ वैद्यकीय पथके तैनात केली. सरकारी अधिकारी नुकसानीचे आकलन करण्यात व्यस्त आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande