संसदेतील गोंधळावर भाजपची काँग्रेसवर टीका; विरोधक दुटप्पी असल्याचा आरोप
नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि इंडी आघाडीवर संसदेचे कामकाज ठप्प केल्याचा आरोप केला. भाजपने म्हटले की, संसदेच्या एका अधिवेशनावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रश्नोत्तराचा तास होऊ
Sambit Patra, BJP Spokesperson


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि इंडी आघाडीवर संसदेचे कामकाज ठप्प केल्याचा आरोप केला. भाजपने म्हटले की, संसदेच्या एका अधिवेशनावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रश्नोत्तराचा तास होऊ शकलेला नाही. शून्यकाळ ही सतत बाधित होत आहे आणि जवळपास कोणत्याही विधेयकावर चर्चा होऊ शकलेली नाही.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. पात्रा म्हणाले की, झारखंडमध्ये जेपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मात्र काँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही आणि संसदेतही हा मुद्दा उपस्थित करत नाही. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या हातात या मुद्द्याबाबत एकही फलक दिसला नाही, यावरून त्यांचा विरोध केवळ सेलेक्टिव्ह आऊटरेज असल्याचे स्पष्ट होते.

संबित पात्रा यांनी कर्नाटक पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, या प्रकरणावर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून प्रियांक खरगे यांना जबाबदारी स्वीकारण्याबाबत विचारले असता, त्यांनी कथितपणे आधी विद्यार्थी 25 दिवस उपोषण करतील, त्यानंतर त्यांच्यावर लाठीमार होईल आणि मगच ते आपल्या राजीनाम्याची चिंता करतील, असे विधान केले.

ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे मौन बाळगून आहेत. पात्रा म्हणाले की, राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर सविस्तर भाषण केले, जे योग्य आहे कारण या विषयावर चर्चा व्हायला हवी. मात्र, कर्नाटकमध्ये त्यांच्या मुलाने याच मुद्द्यावर कथितपणे असंवेदनशील आणि अमानवीय विधान केले असताना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजप खासदारांनी असा आरोपही केला की, विरोधक संसदेत महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ देत नाहीत. ते म्हणाले की, जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक, 2026 हे नागरिकांच्या जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदी असलेले विधेयक आहे, मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी त्यावर एक दिवसही चर्चा होऊ दिली नाही.

ते म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक, 2026 हेही बँकिंग व्यवस्थेशी संबंधित कोट्यवधी लोकांच्या हिताचे महत्त्वाचे विधेयक आहे. मात्र, सभागृहातील सातत्यपूर्ण गोंधळामुळे देशातील जनतेला त्यावर कोणतीही अर्थपूर्ण चर्चा ऐकायला मिळत नाही. विरोधक संसदेत गोंधळ घालण्यात व्यस्त आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande