
यवतमाळ, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
बळीराजा सुखावला; सोयाबीन उत्पादकांसाठी ‘कही खुशी, कही गम’
मागील तब्बल ४० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्री दमदार हजेरी लावल्याने दिग्रस तालुक्यातील शेतकर्!यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. करपण्याच्या मार्गावर असलेल्या कापूस व तूर पिकांना दिलासा मिळाला असून, कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
सोयाबीन पिकाची अवस्था काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी चिंताजनक असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्!यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकर्!यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. पिकांची सुरवातीची वाढही चांगली झाली होती. मात्र, मागील दीड महिन्यापासून पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतकर्!यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत होती. विशेषतः कापूस व तुरीची पिके पाण्याअभावी माना टाकू लागली होती. अनेक शेतांमध्ये जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती. कापसाची पाने पिवळी पडून झाडे करपण्यास सुरुवात झाली होती, तर तुरीलाही पाण्याची तीव्र गरज भासत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत शनिवारी रात्री व रविवारी कमीजास्त प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात का होईना, मोठा आधार मिळाला आहे. जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने कापूस व तूर पिकांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके ऐन वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पावसामुळे शेतकर्!यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यासोबतच शेतशिवारातील चारा उपलब्ध होण्यास मदत मिळणार असल्याने जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटण्याची शक्यता आहे. वरुणराजाने सातत्य कायम ठेवावे, पिकांना गरजेच्या वेळी पाणी मिळावे, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी