चंद्रपूर, 26 जुलै (हिं.स.)। तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुध्द करून जेरबंद केले आहे. तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली नियतक्षेत्रात नवानगर येथील जनाबाई जनार्धन बागडे (५१) या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंदरे या दोघांचा बळी वाघाने घेतला होता. वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये ताडोबाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए.सी.मराठे यांनी वाघाला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे.
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव / सुधांशू जोशी