आरबीआयची नवी चेक क्लिअरन्स प्रणाली झाली लागू
काही तासांत खात्यात जमा होणार रक्कम मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची नवीन चेक क्लिअरन्स प्रणाली आजपासून (४ ऑक्टोबर) देशभर लागू झाली आहे. या प्रणालीअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर रक्कम काही तासांत प्रक्रिया होऊन थेट खात्यात
RBI new cheque clearance system


काही तासांत खात्यात जमा होणार रक्कम

मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची नवीन चेक क्लिअरन्स प्रणाली आजपासून (४ ऑक्टोबर) देशभर लागू झाली आहे. या प्रणालीअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर रक्कम काही तासांत प्रक्रिया होऊन थेट खात्यात जमा केली जाईल. पूर्वी यासाठी दोन दिवस लागायचे. कंटीन्युअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट नावाने ओळखली जाणारी ही प्रणाली बँकांच्या कामकाजाच्या वेळेत कार्यरत राहील. बँका चेक स्कॅन करून डिजिटल प्रतिमा तयार करतील आणि काही तासांत क्लिअरिंग पूर्ण करतील.

एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यासारख्या प्रमुख खाजगी बँकांनी ग्राहकांना त्यांच्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून चेक बाउन्स होणार नाहीत. तसेच, चेकवरील सर्व तपशील योग्यरित्या भरण्याचेही सूचन करण्यात आले आहे. बँकांनी सुरक्षिततेसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम वापरण्याचा सल्ला दिला आहे. या प्रणालीअंतर्गत, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि लाभार्थ्याचे नाव बँकेला किमान २४ तास आधी द्यावे लागते.

नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना आता त्याच दिवशी पैसे मिळण्याची शक्यता वाढली आहे. सकाळी जमा केलेला चेक दुपारी किंवा संध्याकाळी खात्यात जमा होऊ शकतो. ही सुधारणा चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सीटीएस ही अशी प्रणाली आहे ज्यात चेकची भौतिक देवाणघेवाण करण्याऐवजी डिजिटल प्रतिमा बँकांदरम्यान पाठवल्या जातात.

या नवीन प्रणालीत सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान जमा केलेले चेक ताबडतोब स्कॅन करून क्लिअरिंगसाठी पाठवले जातील. बँकांमध्ये सेटलमेंट सकाळी ११ पासून दर तासाला होईल. पेमेंट करावयाच्या बँकेला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पुष्टी करावी लागेल, अन्यथा चेक आपोआप मंजूर होईल.

ही प्रणाली देशभरातील सर्व बँक शाखांमध्ये, विशेषतः आरबीआयच्या दिल्ली, मुंबई आणि चेन्नई ग्रिडअंतर्गत लागू असेल. पहिल्या टप्प्यात, ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान बँकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिसाद द्यावा लागेल, तर दुसऱ्या टप्प्यात, ३ जानेवारी २०२६ पासून बँकांना फक्त तीन तासांत चेकची पुष्टी करावी लागेल.

या प्रक्रियेसाठी कोणतेही नवीन शुल्क आकारले जाण्याबाबत अद्याप माहिती नाही. आरबीआयचे म्हणणे आहे की, या प्रणालीमुळे व्यवहार जलद, पारदर्शक आणि सुरक्षित होतील. डिजिटल पेमेंटसोबतच चेकचा वापर आत्मविश्वासाने करतील आणि बँकिंग प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande