सौराष्ट्र तिसऱ्या दिवशी १ बाद १६५, हार्विक देसाई व जय गोहिलची नाबाद अर्धशतके
महाराष्ट्र वि सौराष्ट्र रणजी ट्रॉफी सामना नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर सौराष्ट्रने ५० षटकांत १ बा
सौराष्ट्र तिसऱ्या दिवशी १ बाद १६५, हार्विक देसाई व जय गोहिलची नाबाद अर्धशतके


महाराष्ट्र वि सौराष्ट्र रणजी ट्रॉफी सामना

नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)

- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर सौराष्ट्रने ५० षटकांत १ बाद १६५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवस अखेरचे नाबाद फलंदाज सलामीवीर यष्टीरक्षक हार्विक देसाई व जय गोहिलने तिसऱ्या दिवशीच्या ३८ षटकांच्या खेळात भागीदारीत आणखी १०४ धावा जोडल्या आणि १ बाद २६ वरून एकूण १३९ धावांची अतूट भागीदारी रचली. त्यादरम्यान हार्विक देसाईने नाबाद ७० तर जय गोहिलने नाबाद ७४ धावांपर्यंत मजल मारली.

त्याआधी एन डी सी ए ग्राउंडसमनच्या अथक मेहनतीमुळे दुसऱ्या दिवशी चहापानानंतर सुरु झालेल्या महाराष्ट्र व सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यास तिसऱ्या दिवशी परत खराब हवामानाचा फटका बसला. दुसऱ्या दिवसअखेर अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला होताच , पण नंतर संध्याकाळी देखील नाशिकमध्ये मैदान व परीसरात जोराचा पाऊस पडला.त्यामुळे सोमवारी सकाळी तिसऱ्या दिवशी देखील सकाळच्या दोन्ही सत्रात , दुसऱ्या दिवशी सारखेच परत सर्व सोपस्कार -अगदी घमेल्यात पेटते लाकूड- विस्तव ठेऊन ठराविक जास्त ओल असलेल्या ठिकाणी त्यापासूनची उष्णता देत त्यांनी मैदान सुकवणे - यासारख्या गोष्टी करण्याची वेळ मैदान कर्मचारयांवर आली . ओले मैदान व खराब हवामानामुळे दोन्ही पंचांनी सकाळी नऊ , अकरा , दुपारी एक व त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजता अशी वेळोवेळी मैदानाची सखोल पाहणी केली. सूर्यप्रकाश कायम राहिल्याने , सर्व प्रयत्नानंतर अखेर दुपारी तीन वाजता खेळ सुरु होऊ शकला. त्यानंतर अडीच तास साडेपाच पर्यंत विनाव्यत्यय ३८ षटके खेळ झाला.

पण त्यात महराष्ट्राच्या मुख्य ६ व एकूण ७ पैकी कोणाही गोलंदाजाला सौराष्ट्रचा फलंदाज बाद करण्यात यश आले नाही.साधारण पहिल्या तासानंतर विकी ओस्तवाल , रामकृष्ण घोष यांचे काही चेंडू खेळताना फलंदाज थोडेफार चकले. पण सुरवातीचा अर्धा एक तास मुकेश कुमार चौधरी व प्रदीप दाढे यांची गोलंदाजी जपून खेळल्यानंतर शेवटच्या तासात हार्विक देसाई व जय गोहिल दोघांनी हि आत्मविश्वासाने फलंदाजी करत संघाचे नुकसान होऊ दिले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande