ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं आणि यशस्वी ऑपरेशन - पंतप्रधान
भोपाळ, 31 मे (हिं.स.) - सिंदूर हे आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचं प्रतीक आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचं रक्त सांडलं नाही, तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पा
पंतप्रधान मोदी भोपाळ


भोपाळ, 31 मे (हिं.स.) - सिंदूर हे आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचं प्रतीक आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचं रक्त सांडलं नाही, तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिलं आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसह त्यांच्या आकांसाठी काळ ठरलं आहे. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचं सर्वात मोठं आणि यशस्वी ऑपरेशन आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले आणि अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याच दरम्यान जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. देवी अहिल्याबाई भारताच्या वारशाच्या एक महान संरक्षक होत्या. त्यांनी काशी विश्वनाथसह देशभरातील अनेक मंदिरे, आपल्या तीर्थक्षेत्रांचे पुनर्निर्माण केले. देवी अहिल्याबाईंच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील पहिले 300 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे आणि त्यात 50 टक्के चांदी आहे. एका बाजूला अहिल्याबाईंचा फोटो आहे. देशात आणि जगात जारी होणारे हे पहिलेच नाणे आहे, ज्याची किंमत 300 रुपये आहे.

मोदी पुढे म्हणाले की, आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचं उत्तर गोळीनेच दिलं जाईल. पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचं प्रतीक बनलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या ऑपरेशनमध्ये बीएसएफने खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवलं आहे. संपूर्ण जग मुलींचे शौर्य पाहत आहे, असेही मोदी म्हणाले.

शाळेपासून ते युद्धभूमीपर्यंत.... आज देश आपल्या मुलींच्या शौर्यावर अभूतपूर्व विश्वास ठेवत आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमा असोत किंवा सीमापारचा दहशतवाद असो...आज आपल्या मुली भारताच्या सुरक्षेचे कवच बनत आहेत. जम्मूपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सीमेपर्यंत मोठ्या संख्येने बीएसएफच्या आपल्या मुली मोर्चा सांभाळत आहेत. त्यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरपासून ते शत्रूंच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यापर्यंत बीएसएफच्या मुलींनी अद्भुत शौर्य दाखवले. ऑपरेशन सिंदूरने डंके की चोट पे सांगितले की दहशतवाद्यांकडून छुपा युद्ध चालणार नाही, आता घरात घुसूनही मारू आणि जो दहशतवाद्यांना मदत करेल त्यालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे महिलांच्या नेतृत्त्वात झालं आहे. आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमधील शंभरपेक्षा अधिक किलोमीटर दूरच्या दहशतवाद्यांच्या स्थळांवर निशाणा साधत त्यांना उद्धवस्त केलं आहे. आता भारत हा दहशतवादाला खपवून घेणार नाही, असं मोदी म्हणाले.

या ऑपरेशनमध्ये बीएसएफने मोठी भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जम्मू, पंजाब, गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरून बीएसएफच्या आपल्या मुली आघाडीवर होत्या. त्यांनी सीमापार गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. कमांड अँड कंट्रोल सेंटरपासून ते शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यापर्यंत, बीएसएफच्या शूर कन्यांनी असाधारण शौर्य दाखवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande