बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक
नवी दिल्ली , 1 जून (हिं.स.)। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. रणजीत कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्या
रणजीत कासले


नवी दिल्ली , 1 जून (हिं.स.)। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. रणजीत कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रणजित कासले याला दिल्लीतून अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले असल्याची माहिती ही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात दोन वेगवेगळ्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि समाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांनी रणजित कासले विरोधात तक्रार दिली आहे. तर मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियावर केल्याच्या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी रणजित कासले विरोधात तक्रार दिली आहे.या दोन्ही तक्रारीवरून रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

या पूर्वी रणजित कासले विरोधात बीड, परळी, आंबेजोगाईसह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.त्यानंतर आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान,रणजित कासले याला आठवड्यापूर्वीच जामीन मिळाला होता.त्यानंतरही त्याने शनिवारी (दि. ३१) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आरोपाचे सत्र सुरु ठेवले.त्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा बड्या नेत्यांविरोधात दावे केले.त्यांनतर आता याप्रकरणात करुणा शर्मा- मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पोलीस उपनिरीक्षक रणजीत काळसे यांनी खुलासे केलेल्या नेत्यांवर सीबीआय तथा केंद्रीय तपास यंत्रणामार्फत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याचा सखोल तपास करण्याची विनंती मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande