उ.प्र. : मोटरमनच्या प्रसंगावधानाने मोठा रेल्वे अपघात टळला
लखनऊ, 1 जून (हिं.स.)।उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात रेल्वे चालकाच्या प्रसंगवधानाने टळला आहे. काही समाजकंटकांनी शामली आणि बालवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रुळावर अवजड लोखंडी पाईप ठेवला होता. या माध्यमातून गाडी रुळावरून
उ.प्रदेश रेल्वे अपघात


लखनऊ, 1 जून (हिं.स.)।उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात रेल्वे चालकाच्या प्रसंगवधानाने टळला आहे. काही समाजकंटकांनी शामली आणि बालवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रुळावर अवजड लोखंडी पाईप ठेवला होता. या माध्यमातून गाडी रुळावरून उतरवण्याचा डाव होता. मात्र, ट्रेन चालकाने सावधगिरी दाखवून ट्रेन थांबवली आणि अपघात टाळला.

शामली आणि बालवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रुळावर अज्ञातांनी १० फूट लांब सिमेंटचा पाईप आणि १५ फूट लांब लोखंडी पाईप ठेवला होता. तसेच अनेक दगडही ठेवण्यात आले होते. मात्र, यावेळी ड्राइवरने प्रसंगावधावन दाखवत ट्रेन थांबवली आणि अपघात टळला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रेल्वे रुळावरील अडथळा दूर केला.सुमारे तासभरानांतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमागे काही समाजकंटकांचा हात असू शकतो, अशी प्राथमिक माहिती समजत आहे. पोलीस या घटनेचा तपास सर्व बाजूने करत आहेत. तसेच या प्रकरणातील अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande