विमान अपघात : एअर इंडिया देणार 25 लाखांची मदत
टाटा सन्सचे मिळून प्रत्येकाला 1.25 कोटी रुपये मिळणार नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) : एअर इंडियाने अहमदाबाद विमान अपघातातील मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. टाटा सन्सने यापूर्वीच 1 कोटींच्या मोबदला देणार असल्याचे जाही
अपघातग्रस्त विमानाचे अवशेष


टाटा सन्सचे मिळून प्रत्येकाला 1.25 कोटी रुपये मिळणार

नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) : एअर इंडियाने अहमदाबाद विमान अपघातातील मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. टाटा सन्सने यापूर्वीच 1 कोटींच्या मोबदला देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक व्यक्तीमागे 1 कोटी 25 लाख रुपये मिळणार आहेत.

एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान 12 जून रोजी दुपारी 1.39 वाजता कोसळले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्यामुळे या अपघातात सुमारे 275 जण मृत्यूमुखी पडलेत. तर 40 हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. टाटा सन्सने उपचाराचा सर्व खर्च आपण करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेजला त्यांची इमारत पूर्ण बांधून देण्यास मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande