मुंबई, १५ जून (हिं.स.) : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आज, रविवारी कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 25 पेक्षाही अधिक लोकं या नदीत वाहून गेलीत तर काहीजण पुलाखाली दबली गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रविवार असल्याने बरेच पर्यटक वर्षा सहलीसाठी आले होते. यातील कित्येकांनी जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावर वाहनं उभी केली आणि ओव्हरलोड झाल्याने पूल कोसळला. दरम्यान, घटनास्थळी पुण्याचे जिल्हाधिकारी दाखल होत त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी