अमरावती, 4 जून (हिं.स.) :प्रभाग रचना २०१७ च्या म्नपा निवडणुकीप्रमाणे करायची की, शासन याबाबत नव्याने आदेश जारी करणार याची प्रतीक्षा असताना शासनाने अद्याप कोणताही आदेश काढला नसल्याने सर्वांचे लक्ष एकदा आदेश केव्हा घडकतो याकडे लागले आहे. प्रभाग रचनेची निश्चिती झाली की, झाडून सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक आणि अपक्ष असे सर्वच कामाला लागण्यास मोकळे होतील. परंतु, आज निघेल, उद्या निघेल म्हणता, म्हणता एक आठवडा निघून गेला तरी अद्याप आदेश काही धडकला नाही.
शासनाला पावसाळ्यात मनपा असो किंवा अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, हेच यातून स्पष्ट होत आहे. नव्याने जनगणना झाली नसली तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत. त्या दिवाळीनंतर घेण्याचा राज्य शासनाचा या चालढकलीतून प्रयत्न दिसत आहे. विद्यमान राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. यात भाजप, पार्टी अजित पवार गट अशी तीन पक्षांसह इतर घटक पक्षांच्या या के सरकारमध्ये प्रत्येकच पक्ष स्वबळावर मनपा निवडणूक लढण्याची तयारी चालवली असून प्रत्येकाने मोर्चे बांधणीही सुरू केली आहे. युतीधर्म किंवा आघाडी धर्म पाळायचा नाही अशीच भाषा सध्या राजकीय पक्षांचे स्थानिक नेते वापरत आहेत. त्यामुळेच खरी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण कोणते उमेदवार रिंगणात आणणार. ऐनवेळी कोण कुठे पळणार याबाबत प्रभाग रचनेची निश्चिती झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मनपा निवडणूक दिवाळी आधी की नंतर
मनपा निवडणूक दिवाळी आधी की नंतर होणार याचीच उत्सुकता लागली आहे. बहुतेक जण २०१७च्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक होणार अशी अपेक्षा बाळगून आहेत. अर्थात २२ प्रभागातील ८७ नगरसेवक मनपात यावेळीही राहतील. केवळ एका लोकसंख्येने लहान असलेल्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. यात ओबीसीच्या २३ जागा राहतील. त्यातही १२ जागा या महिलांच्या वाट्याला येतील, अशी प्रभागरचना निश्चित होण्याच्या आधीची स्थिती आहे. हीच प्रभाग रचना कायम राहिल्या बदलणार नाही. परंतु, बदल झाला तरच बदल त असे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी