अमरावती, 4 जून (हिं.स.) : विमानसेवा सुरू करताना सर्वसामान्य माणसं विमान स्वारीचा आनंद घेऊ शकतील असे दावे करण्यात आले होते. मात्र आता या दाव्यातील ओलपणा बाहेर आला आहे. अमरावती - मुंबईचे ९ जूनचे तिकीट चक्क १७८५० रूपये एवढे आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात भाडे आकाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह श्रीमंतदेखील प्रवास करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती - मुंबई विमानसेवा सुरू करताना एमएडीसीच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते की, क्षत्रिय उडाण योजनेच्या अंतर्गत अमरबिती कात्मुंबई विमानसेवेचे तिकीट सर्व टॅक्ससह २४९९ रूपये राहणार आहे. या सह एटीआर ७२ पलाईटच्या ७२ पैकी ३६ आसनांचा भार सरकार घेणार होती तर ३६ अलाएन्स एअर घेणार सोबत क्षेत्रिय उडाण सेवेच्या विमानामध्ये चढउतार दर आकारले जाणार नव्हते. पण या फ्लाईटचे तिकीट नेहमीच महागडे असते. आतापर्यंत मुंबई - अमरावती फ्लाईटचा रेट ८ ते ९ हजार एवढा होता. पण आता ९ जूनची मुंबई तिकीट १७८५० रूपये एवढी आहे. विशेष म्हणजे प्लाईटमध्ये अनेक सिट खाली राहत असल्याचा आरोप केल्या जात आहे. असे असताना मग या फ्लाईट मध्यं चढउताराचे तिकीट दर कशाला लावले जात आहे. काही दिवसा अगोदर नितीन मोहोड यांनी आरोप केला होता की हेतुपुरस्सपणे फ्लाईटाचे तिकीटाचे चढ्या दराने आकारले तर प्रवाशांची संख्ये कमी होईल आणि त्यानंतर हे कारण समोर करून विमासेवा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी