अहिल्यानगर, 4 जून (हिं.स.) :- नगर तालुक्यातील अकोळनेर, सारोळा, कासार, वाळकी, शिराढोण, खडकी, खंडाळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा हाहाकार झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घरामध्ये डोक्या एवढे पाणी घुसले असल्यामुळे नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर व झाडावर अस्रय घ्यावा लागला. तसेच काही नागरिक पुराच्या पाणी मध्ये अडकले होते. ते आपला जीव वाचवण्या साठी आरडा-ओरडा करत मदत मागत होते. अशा संकट कालीन परिस्थतीमध्ये नगर तालुक्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उतरून नागरिकांचे प्राण वाचवले. प्रल्हाद गिते याच्या धाडसी कार्यामुळे पोलीसांची प्रतिमा जनसामान्य लोकांमध्ये नक्की च उंचावेल असे प्रतिपादन सचिन जगताप यांनी केले.
नगर तालुक्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना आ.संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशनचा शौर्य पुरस्कार प्रदान करताना. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिनभाऊ जगताप , माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, वैभव ढाकणे, गोरख दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.नगर तालुक्यात विविध भागात २७ मे रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे वाळूंबा नदीला पूर आला होता.या नदीच्या पुरात अडकले ल्या ५ जणांना पोलिस प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले होते. यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी वाहत्या पाण्यात उतरून दोरीच्या साह्याने ५ नागरिकां ना सुखरूप बाहेर काढले होते.त्यांच्या या अनमोल कामगि रीमुळे त्यांना आ.संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशनचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती वैभव ढाकणे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni