विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीमध्ये बदल केल्याने दर्शन रांग जलद गतीने
सोलापूर, 3 जुलै (हिं.स.)। यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीमध्ये अनेक बदल केल्याने दर्शन रांग जलद गतीने पुढे जात आहे. परिणामी ऐरवी 18 -18 तास दर्शन रांगेत उभे राहणार्या भाविकांचे आता अवघ्या सहा ते सात तासांमध्ये विठ्
Vithal Rukmitni mandi news for today


सोलापूर, 3 जुलै (हिं.स.)। यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीमध्ये अनेक बदल केल्याने दर्शन रांग जलद गतीने पुढे जात आहे. परिणामी ऐरवी 18 -18 तास दर्शन रांगेत उभे राहणार्या भाविकांचे आता अवघ्या सहा ते सात तासांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन होत आहे. दर्शनाचा कालवधी निम्यावर आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वारीकाळात वशिल्याचे ( व्हीआयपी) दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दर्शनाची गती आणखी वाढली आहे. आषाढी पालखी सोहळा पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी आहे. मागील आठवडाभरापासून भाविकांना दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने दर्शन बारीचे सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. दर्शनबारीमध्ये घुसखोरी होऊ नयेयासाठी दर्शनबारीला जाळी लावण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वशिल्याचे दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेतील भाविकांन लवकर दर्शन मिळू लागले आहे. सध्या दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना केंद्रबिंदू ठेवून मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊनये यासाठी पंखे,कुलरची सोय केली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आषाढी पालखी सोहळा पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी आहे. मागील आठवडाभरापासून भाविकांना दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने दर्शन बारीचे सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. दर्शनबारीमध्ये घुसखोरी होऊ नयेयासाठी दर्शनबारीला जाळी लावण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वशिल्याचे दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेतील भाविकांन लवकर दर्शन मिळू लागले आहे. सध्या दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना केंद्रबिंदू ठेवून मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊनये यासाठी पंखे,कुलरची सोय केली आहे. याशिवाय चहा, नाश्ता, जेवण, फराळाचीही सोय केली आहे. वारीकाळात अधिकाधिक भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने नियोजन केले आहे. पूजा आणि स्वच्छतेचा कालावधी वगळता सुमारे 22 तास मंदिर दर्शनासाठी खुले आहे. भाविकांनी दर्शन रांगेतून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande